हल्ली नेत्यांचा स्वाभिमान
खरेच मरून गेला आहे
राजकारणाचा अखाडा
इतुका मलिन झाला आहे?
महाराष्ट्रात सगळीकडे
निसटावंतांचा बोलबाला आहे
खोबरं तिकडं चांगभलं हाच
राजकारण्यांचा टोला आहे
राजकारण म्हणजे
नवीन गलासात
जुन्याच वाईन चा पेला आहे
जो तो पवित्र होण्या
भाजपात गेला आहे
नवीन पक्षांचा उदय अन
जुन्या पक्षांना झोला आहे
महाराष्ट्रात एस.काँग्रेस नंतर एस.बीजेपी
पक्ष उदयास आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा