नागपंचमी
येरे येरे सापराया
आणिल्या मी दुध-लाह्या
वचन दे भाऊराया
येशील तू संकट समया
तुजसाठी मी उपवास धरते
दर्शनाने तुझ्या चिंता हरते
२१व्या शतकातही नागपंचमीचे
महत्व आहे
सापाला भाऊ मानण्याचे
मुलींचे तत्व आहे
विषारी असूनही सापाला
बहिणीचे ममत्व आहे
कदाचित बहिण भावाच्या प्रेमामुळेच
सापाला अमरत्व आहे
विष नसूनही डसनारा माणूस
पावलो-पावली भेटतो
यामुळेच विषारी साप
मुलींना भाऊ वाटतो
माणूस मुलीना चावला कि,
माणसाचा विचार गोठतो
म्हणूनच सापाला भाऊ मानण्याचा
मुलींचा विचार पटतो
बहिण भावाचे हे प्रेम
असेच वाढत जावो
सापासारखेच नागपंचमीलाही
अमरत्व प्राप्त होवो
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२७/०७/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा