बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४
मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४
सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४
शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४
रविवार, १० ऑगस्ट, २०१४
रविवार, ३ ऑगस्ट, २०१४
सीमाभाग
सीमाभाग
दिल्या कितीही धमक्या
बंद केल सीमेच दार
तरी लक्षात ठेवा एक
वाढेल तलवारीची धार
मराठी आहोत आम्ही
नाही मानणार अशी हार
शिवबाचे नाव घेऊन
झेलू छाताडावर वार
काळे कानडी सरकार,
दडपशाही काळी ,
काळी कानडी मन
अन माणसेहि काळी
पण लक्षात ठेवा एक
आता आहे आमची पाळी
सरकार सकट करून टाकू
कर्नाटकची होळी
मराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्यात
पण लढणे विसरलो नाही
आम्ही मागे लागलो तर
पाळायला कमी पडेल भूई
कानड्य़ानो थांबवा आता
सीमाभागातील हल्ले
बूरजसकट जागे करू
महाराष्ट्रातील किल्ले
सीमाभागातील मराठीनो
धीर नका सोडू
महाराष्ट्र तूमच्या सोबत आहे
आपण सोबत लढू
त्यांच्या अंगातली गोम
आपणच ठेचून काढू
मराठ्यानो भीमा,कृष्णेच पाणी
यांना नका सोडू
ते नक्की मात घेतील
आपण लढत राहू
एक दिवस कर्नाटकाला
बेळगावचे नाव देऊ
बेळगावच काय आख्खा कर्नाटक
महाराष्ट्रात घेऊ
स्वलिखित
नितीन खापरे
दि. ०४/०८/२०१४
शनिवार, २६ जुलै, २०१४
नागपंचमी
नागपंचमी
येरे येरे सापराया
आणिल्या मी दुध-लाह्या
वचन दे भाऊराया
येशील तू संकट समया
तुजसाठी मी उपवास धरते
दर्शनाने तुझ्या चिंता हरते
२१व्या शतकातही नागपंचमीचे
महत्व आहे
सापाला भाऊ मानण्याचे
मुलींचे तत्व आहे
विषारी असूनही सापाला
बहिणीचे ममत्व आहे
कदाचित बहिण भावाच्या प्रेमामुळेच
सापाला अमरत्व आहे
विष नसूनही डसनारा माणूस
पावलो-पावली भेटतो
यामुळेच विषारी साप
मुलींना भाऊ वाटतो
माणूस मुलीना चावला कि,
माणसाचा विचार गोठतो
म्हणूनच सापाला भाऊ मानण्याचा
मुलींचा विचार पटतो
बहिण भावाचे हे प्रेम
असेच वाढत जावो
सापासारखेच नागपंचमीलाही
अमरत्व प्राप्त होवो
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२७/०७/२०१४
गुरुवार, २४ जुलै, २०१४
चारोळी
उठ रे मना
आता शहाण्यासारखं वागायचं
हे दुखःमय जीवन
आता नाही जगायचं
आजपासून बंद
तीझा फोटो बघायचं
देवाकडे फक्त
तिझ सुख मागायचं
आजपासून फक्त
स्वतःसाठी जगायचं
स्वलिखित
नितीन खापरे
दि.२४/०७/२०१४
मंगळवार, २२ जुलै, २०१४
भूक
भूक
उठ गड्या उठ
आवळ तुझी मुठ
पोटाच खळग भराया
धावत पुढ सूट
भूतकेत नसतात
रात्रीचाही पळ
थांबू नकोस मधे
जरी पायात आली कळ
घामातून निघून जाईल
अंगावरचा मळ
थांबलास की पोटाला
भुकेची झळ
भुकेल्या पोटाला
मेंदूशी रगड
दया मया नको
बन तू दगड
मातीतून आलास तरी
हिऱ्यासारखा घड
स्वतःचा घास वाचाविण्या
जगाशी झगड
भुकेला नसते जात-पात
ती पहात नाही दिन-रात
ती सैरावैरा पळते
भूक लागली कि,
पोटासोबत आतडेही जाळते
भूकेची किंमत तुझ्यासारख्या
भूकेलेल्याच कळते
खाऊ नकोस कोणी
दिली तूप-साखर
रात्र झाली झोपडीत
परत ये लौकर
खा आईने ठेवलेली
आर्धी चटणी भाकर
दोन तांबे पाणी पिऊन
दे तृप्त ढेकर
चल आता पोत्यावरती
लेपाट घेऊन नीज
उद्या परत चमकेल भूक
जशी चमकत असते वीज
स्वलिखित
नितीन खापरे
दि,२३/०७/२०१४
मंगळवार, १५ जुलै, २०१४
जीवन म्हणजे आहे तरी काय ?
सकाळची न्याहारी आणि एक कप चाय
शाळेला दडी,मित्रांची खोडी,
स्वप्नात सजवलेली तीझी-माझी जोडी
बाकावरची उडी आणि मास्तर ची छडी
खड्यातले पाणी आणि कागदाची होडी
परीक्षेचा ध्यास,अभ्यासाचा ऱ्हास
काठावरती पास,बाबाच बॉस
त्यांनी भरवलेला मारांचा घास
मित्रातील बढाई,PRO. मारण्याची घाई
दुसऱ्या गल्लीत चढाई,पोरीसाठी लढाई
चल दंगा करू उडत गेली पढाई
ड्य़ाम्बिस मास्तर अन सुंदर बाई
पेपर कोरा ठेऊनही संपलेली शाई
कोलेज ला जाने जावई होणे
क्लास मध्ये कमी,बाहेर जास्त रहाणे
मास्तरला न भिणे नडला त्याला धुणे
मित्रांसाठी आपला जीवहि देणे
आईचे प्रेम अन बापाचे टोमणे
कट्ट्यावर बसता तिचे समोरून जाने
मनाला तिच्याकडे भिरकावून देणे
उटता बसता तिचेच भास होणे
पिच्छा करून तिचा होकार घेणे
मग
कॅन्टीन मधली भेट अन बागेतील गप्पा
पुढे पुढे सरकतो एक एक टप्पा
क्रमश. . . . . . . . . . . . .
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



